Open the bedroom where he was there for 34 days on vacation. The room I never called guest room. Always named His Bedroom. So all these days he was spread all over in HIS room with his presence. Though I found him always very disciplined and loving everything inline (unknowingly adopted my habits J ). His things, his presence all over laying.
And now Vacation over. He fully accomplished his break and reached to the point that he should move on now. Natural animal instinct.
So this morning I entered in his room which was leftover with empty paper bags, empty cartons and some medicines strips. Crumpled bedsheets and dusty desks. Mainly closed curtains for his love for the darker room.
I opened curtains. Opened windows. Cool breeze entered. Inhale fully fresh air. Is that a sigh of me? Took off Wi-Fi which was temporarily installed in his room like whole wireless connection of our hearts centred surrounded by him.
I removed the router reinstalled in original place. Changed bedsheets, removed all dust. Everything is now in place like a picture perfect. Now nobody will come to know Soothing, relaxing, free, close bounded feelings were resting here for a month.

My Son just now flying back towards his goals with all heartiest wishes from the universe of my love ones. God bless you all.

विरक्त संध्याकाळ


तिन्ही सांजेकडे कसे बघायचे ते तुमच्या मनावर अवलंबुन असते. संध्याकाळची कातर वेळ, मन हळवे होण्याची वेळ. नकळत जुन्या गोष्टी एकापाठोपाठ एक डोळ्यासमोरून चालत राहतात अन मनाला अजूनच हल्लक करून जातात. संध्याकाळ म्हणजे दिवस संपलेला असला तरी उजेड अजून रात्रीच्या उदरात दडुन गडद झालेला नसतो. मग काळोखाला थोडा अवकाश आहे याच आशेत उद्याच्या नवीन दिवसाची आखणी चालू राहते.

कधीतरी सोबतीला येते एक विरक्त संध्याकाळ
सोबत तिच्या बोटाला धरून येत सुस्त कलंडलेले आभाळ

जमते तिच्या सोबत निरव शांततेची मैफिल
जिथे मौन गाते गीत अन आर्त स्वर होतात गाफील

मग पश्चिमेच्या रंगा सोबत बदलत जाई नूर
शब्दाविना डोळ्यातुनी बरसती सूर

शेवटी अर्धवट मिटलेल्या डोळ्यांना चुकवून संध्या सरकते अंधाराकडे
उद्याची स्वप्ने ती देऊन जाते नव्या उजाडणाऱ्या आभाळाकडे.
Saddens me deeply to write this blog post. On 3rd September 2013 my best friend Pari got her angel wings. She can now breathe easy. Pari an amazing, caring, funny, loving gal like her name 'Pari'. She was passionate about everything in life and was a fighter to the very end. Pari you will be never leave my heart. 
But I am happy, because you are now at peace. you're now no longer in pains and worried about the future. you're no longer suffering and struggling to breathe. 
This post I wrote for what she must be thinking about her young son who was just 11 years old when she was struggling in hospital.

दैवाचा हा बंदिवास त्यात मी सापडले आहे.
हात पाय जड होऊनी मी जखडले आहे.

मिट्ट इथे काळोख आणि जाणिवांची बधिरता 
खोल खोल अंधारात या मी अडकले आहे.

दूर एक तुझी हाक ऐकते मी सोनुल्या 

त्याच आर्ततेने यमास आज, मी अडवले आहे
When you come to the edge of the light that you know, and you are about to step off into the darkness of the unknown, faith is knowing that one of the two things will happen: there will be something to land on, or you will learn how to fly.


The most loneliest feeling in the world is to find yourself standing up when everyone else is sitting down. to have everybody look at you and say "what is the matter with her?" I know what it feels like. 

Walking down an empty street, blinds drawn, doors locked against you. And you are not sure whether you are walking toward something, or if you are just walking away.

Sometimes we need to stop analyzing the past, stop planning the future, stop figuring out precisely how we feel, stop deciding with our minds exactly what we want our hearts to feel, sometimes we just have to go with the flow an just enjoy life.

रुतलेली वेदना


निशब्द किनाऱ्यावर मी गुणगुणत फिरत आहे 
घेऊन हजारो लाटा दर्या  खळखळत आहे
कुठे नेईल बैचेनी मनाचीकधी संपेल शोध मनाचा 
कोराच विचार उद्याचा मनात वळवळत आहे.  
जुन्या आठवणींना मी आत्ताच सारले मागे 
तरी आभासांचा पडदा सतत सळसळत आहे. 
हे कसे उचंबळणे हा तर केवळ लाटांचा  तांडा 
रुतुन वेदना मनाची ,ओल्या वाळुत भळभळत आहे


अस्तित्वावर माझ्या तुझी घट्ट पकड राहते,
दूर गेले कितीही तरी मी शेवटी तुझीच राहते.

मला इथवर आणणारा तो जुना रस्ता गेला कुठे?
या विचारात वाट पुढे चालते, चालतच राहते.

हृदयी रुतला काटा खोलवरी आज असे का वाटावे?
नेमक्या कोणत्या भावनेची बोच सलत राहते ?

प्रश्न नाही असा कि जीवना, एवढा का तुझा ताबा मजवरी?
प्रश्न आहे असा - मी तुझ्यावर एवढी विसंबून का राहते?

उभारले जरी मनाला पुन्हा आज नव्याने ,
तडा राहतो , डाग राहतो, जखम ठसठसत राहते.

तरी नव्या निर्धारांनी  भरून वाहते मनाची नदी,
एक शाश्वती जेव्हा पुलाच्या कडेला उभी राहते.

आज वळुन पाहताना ...

आज वळून पाहताना जीवना, तुला शोधावे लागले ,
किती काळ लोटला मधे हे मला मोजावे लागले.


कोंडलेल्या भावनांना व्यक्त ना केले कधी,
हृदयी जे घुसमटले ते मला सोसावे लागले.


सापडला नाही मजला चेहरा हा तुझा कधी,
रोज नवे मुखवटे तुझे हे मला ओळखावे लागले.


निसटलेल्या नात्यांची वाटली ना खंत कधी,
पण बांधणारे बंध कोणते ? हे मला आठवावे लागले.


या सुखानो वाट चुकवूनी माझ्याही दारी कधी,
दु:ख लिम्पुनी घर माझे हे मला सारवावे लागले.


भूतकाळाची करुन पाहु उजळणी ती पुन्हा कधी,
किती राहिले 'हातचे' बाकी हे मला मांडावे लागले.


वाट पहाते तुझी जीवना, भेटुन जा एकदा कधी,
तुझे केवढे हे ऋण मजवरी, मला फेडावे लागले.


आज वळून पाहताना जीवना, तुला शोधावे लागले
किती काळ लोटला मधे हे मला मोजावे लागले.

काही प्रश्न....

आयुष्य एकीकडे आनंद, खंत, हर्ष, खेद, उभारी, नाराजी अशा अनेक पायऱ्यांची चढ उतार करत चालू असत आणि मग अचानक वेगवेगळ्या प्रश्नाच्या परिघात गुरफटून जात. वेळीअवेळी समोर आलेले प्रश्न, उत्तरं ठाऊक नसतानाही निर्व्याजपणे स्वीकारावे लागतात. कारण उत्तरं शोधण्यात मतलब नसतो, गुंता फक्त वाढत जातो. 

लाट , किनारा आणि धरती

लाट आणि किनारा परस्पर विरोधी तरी एकमेकात गुंतलेले नात. लाटेने सतत अवखळपणे किनाऱ्याकडे धावावं आणि जणु तक्रार करत किनाऱ्याला विचारावं " तु सदा कोरडा अन मलाच का नेहमी अस उधाण यावं????? " किनारा मात्र जाणीवपुर्वक तिचा हा अवखळपणा दुर्लक्षित करत तटस्थपणे उभा, जणु धरतीशी घट्ट वचनबद्ध असल्यासारखा..........



म्हणून तर किनाऱ्याने दिवसभर तटरक्षण करून सांभाळलेल्या धरतीला, काळोखाने कुशीत घेतल्यावर ओहटीची जड ओली वाळु किनाऱ्याला सोबत देत असेल का? असा विचार मनात डोकावुन जातो. 

मावळला तो सुर्य क्षितिजावर धुसर झाला किनारा
ओहटीची जड ओली वाळु तिचाच आता सहारा.
उदास किरणे झिरपत गेली खोल काळजात
पश्चिमेस ती लाली पसरली धरतीच्या विरहात.
निशब्द हि सांजवेळ घेऊन येई एकटेपण
आभाळासही देऊन जाई एक विरक्त परकेपण.
अबोल शांत वारा अन स्तब्ध झाला किनारा
अंधारात विलीन धरती अन राहिला एकटा तो बिचारा.
 







तुझ्या पाउल खुणा ...

नवी पहाट...

अंधारात प्रकाशाची वाट चुकले मी .....

अंधारात प्रकाशाची वाट चुकले मी

शोधीत राहिले स्वतःला तरी मलाच न सापडले मी.

 
झेपावले ज्याच्या साठी ते मृगजळ हाती आले

होता जवळी सागर तरी तृष्ट्त राहिले मी.

 
पाहता मृत भावनांना हृदय विदीर्ण झाले

जरी उरले ना बंध काही तरी त्या भावनांचे ओझे वाहिले मी.

धगधगत्या ज्वाळांनी हे जग वेढलेले अन अस्तित्वाची माझ्या चिता पेटलेली
तरी का अंगारात मलाच लोटले मी.


विझेल का हा अग्नी कधी पेटत आहे चिता अजुनी

का धुमसत राहिले आजही निखारे विषन्णवारे जरी थोपवले मी.